Monday, July 9, 2012

चला परत शाळेत जाऊ....

त्या दिवशी खरंचच ऑफिसला जायची अजिबात इच्छा नव्हती आणि तशी ती नसल्याने काम करण्याची तर अजिबातच नाही. असो, तरी असलेलं काम करावाच लागणार इच्छा असो नसो, हा विचार करून कामाला सुरुवात केली.
तरी इच्छा नसली कि मार्ग सापडत नाही हेच खरं. काम कराची इच्छा नव्हती आणि  काहीतरी छान वाचावे असा वाटत होतं म्हणून नेहमी जे जे ब्लॉग्स वाचते त्यावर काही नवी पोस्ट आहे का तेही पाहून झाले. आता मात्र खरच कंटाळा यायला लागला म्हणून नाईलाजाने स्वताला कामात गुंतवून घ्यायचे  ठरवले(जे नेहमीच नाईलाजाने केले जाते.)
काम करत असताना अचानक एका मित्राचा मेल आला. बघण्यात 5 मिनिटे कशाला वाया घालवायची असा विचारही आला मनात एक क्षण, पण मग non-production असं शीर्षक वाचताच तो बघण्याची उत्सूकता वाटली आणि लगोलग तो मेल वाचायला घेतला. पण मग लगेचच का नाही बघितला याचा पश्चाताप झाला.
त्या मेल मध्ये आपण सर्वानीच शाळेत केलेल्या सगळ्या गोष्टी होत्या म्हणजे पावसाळ्यात डबक्यातल्या पाण्यात होड्या सोडणं आणि तेच पाणी एकमेकांच्या अंगावर उडवणं,बर्फाचा गोळा खाणं,शिक्षा म्हणून अंगठे धरून उभं राहणं,गोट्या खेळणं आणि बरंच काही जे आपण सगळ्यांनीच शाळेत केलंय (आता काही असे महाभाग पण असतील ज्यांना या सगळ्या गोष्टीसाठी आपला हेवा वाटेल .)
आणि मग मन काय एकीकडे कामात तर दुसरीकडे शाळेत जाऊन बसलं त्या लाकडी बाकावर.
आजही आठवतोय मला माझ्या बालवाडीचा पहिला दिवस, माझी बालवाडी एका मंदिरात असायची.आईने सांगितल्याप्रमाणे मी भोकाड पसरून ते सगळ मंदिर डोक्यावर घेतलं होतं. त्या देवाने पण नक्की कानात बोटे घातली असतील. पण नंतर मला ती शाळा फार आवडायला लागली. आमच्या पेंडसे बाई फार छान होत्या.अजूनही भेटायला गेले त्यांना कि जुन्या आठवणी निघतात. मी जवळ जवळ रोज त्यांचा मार खायचे कारण रोज कुणाला तरी मारायचे. मग आई शाळेतून घ्यायला आली कि बाई तिच्याकडे तक्रार  करायच्या आणि मग काय विचारता, मग घरी गेल्यावर पुहा बाबांचा ओरडा ज्याची मला सवय झाली होती.
पण त्यांच्यामुळे मला गोष्टींचे भारी वेड लागले. त्या रोज एक नवी गोष्ट सांगायच्या. मला आजही प्रश्न पडतो किती मोठा खजिना होता त्यांच्याकडे रामायण, महाभारत्पासून,चिऊ काऊ , सगळे प्राणी पक्षी,परी, राजा राणी सगळा काही. आणि प्रत्येक गोष्टी नाधून एक शिकवण. श्रीगणेशा शिकले तो त्यांच्याकडेच अन खरंच आयुष्यातला पहिला गुरु मला भेटला.
पण एकाच वर्षाची बालवाडी आणि निरोपाचा क्षण आला. त्या दिवशी आईने मला सांगितले कि आता तू या शाळेत जायचं अन्ही दुसरी शाळा . मला खूप रडू आला मला माझ्या आवडत्या बाईना सोडून जायचं नव्हतं . तेव्हापासून आजपर्यंत कुणाला निरोप द्यायचा म्हटलं कि जीवावर येतं, आपोआप अश्रू डोळ्यात साठतात.
नंतर माझी शाळा होती "नगरपरिषद शाळा क्रमांक 4 मुलींची शाळा" ती पण छान होती सगळे शिक्षक खूप छान होते . इथे मला खरी वाचनाची गोडी लागली. कारण सगळ्या बाईंना माहित होते कि मला वाचायला आवडते मग त्या मला नेहमी पुस्तक वाचायला द्यायच्या. इथे एक कोडं होता ज्याचं उत्तर मला आजही गवसलं नाहीये तो म्हणजे एकदाही अभ्यास न करता नेहमी माझा पहिला नंबर यायचा.
असो, आज खरच वाटतंय पुन्हा शाळेत जावं, पावसात भिजावं सगळ्या सवंगड्यासोबत, तो बर्फाचा गोळा फस्त करावा सगळ्यात आधी कोण संपवतय याची शर्यत लावून...
15 ऑगस्ट, 26 जानेवारी या दिवसाचं महत्व हल्ली वाटत कारण सुट्टी मिळते म्हणून पण शाळेत असताना त्या दिवशी सगळ्यात आधी कोण तयार होतंय यावरून एकमेकांना चिडवता यायचं. कॉलेजला गेल्यावर सुरवातीची दोन वर्षे ती सुट्टी हवीशी वाटली पण नंतर ती नकोशी वाटू लागली आणि शाळेतल्या जेवढ्या मित्र मैत्रीणीना शक्य आहे तेवढ्यांनी शाळेत जायचं ठरवलं दोन्ही पैकी एका तरी दिवशी. शाळेत गेलो कि मग सगळे दिवस पुन्हा आठवू लागायचे.
पण या वेळी ते शक्य नाही याच सतत वाईट वाटतंय कारण एकतर मित्र मैत्रिणी पण भेटणार नाहीत शाळा पण नाही अन शिक्षक पण नाही.
खरच मला पुन्हा शाळेत जायचं लहान होऊन. होता येईल. या क्षणी मला तो अल्लौद्दीनाचा दिवा भेटावा मी त्याला नक्की मागेन कि मला पुन्हा लहान कर आणि माझ्या शाळेत नेऊन बसव।.

मिळेल का मला तो दिवा??????


No comments:

Post a Comment